लिहितो मी, असेच कधीतरी काहीतरी……
दिक्कालांतून पार जात
काळ -वेळेचे तोडून बंधन
ब्रह्मांड पालथा घालतो
विश्वातल्या प्रत्येक अणुरेणूत जाऊन
स्वतःला हरवून……
कधी-कधी उसळतात रक्तांचे फवारे
वाहू लागतात बेधुंद होऊन नसानसात.
प्रकाशाच्याही वेगापेक्षा कैकपटीने
त्या हृदयाला भिडायला
मनातून हद्दपार झालेल्या
माणसातल्या माणुसकीला शोधायला….
लिहितो मी, असेच कधीतरी काहीतरी……
----------------------------------------------------
कवी : निलकवी
0 comments: